पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले तरी तपासात कोणतीही प्रगती नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या प्रकरणातील अद्याप एक आरोपी फरार आहे. आता या प्रकरणातील मास्टरमांइड वाल्मीक कराड यांच्यासह या प्रकरणातील आठ आरोपी विरुद्ध बीडच्या विशेष मकोका कोर्टात आज सीआयडी 1400 पानांचें आरोपपत्र दाखल करणार आहे. त्यामुळे सीआयडी कडून दाखल करण्यात येणाऱ्या 1400 पानी आरोपपत्रात नक्की काय उलगडे होतात हे महत्त्वाचं ठरणार आहे .
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती . आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीतून पुढे ही हत्या झाल्याचे समोर आले . या हत्येची सुरुवात ज्या खंडणी प्रकरणातून झाली होती ,त्या खंडणी प्रकरणापासून अपहरणाच्या प्रकरणापर्यंत तपास सीआयडीच्या हाती होता. खूनाचा तपास SIT कडे आहे. दरम्यान आज सीआयडी करून होणाऱ्या आरोपत्रात मोठी उलगडे आणि गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे..या आरोप पत्रात वाल्मीक कराड ,विष्णू चाटे ,सुदर्शन घुले ,प्रतीक घुले,जयराम चाटे कृष्णा आंधळे सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे यांच्या विरोधात असलेले पुरावे आणि गुन्ह्यातला सहभाग या संदर्भातले पुरावे आहेत . बीडच्या विशेष मकोका कोर्टात ही चार्जशीट दाखल होणार असून साक्षीदारांचे जबाब ,खंडणी प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण ?आरोपींना फरार होण्यासाठी कोणी मदत केली ?आरोपींना आर्थिक मदत कोणी केली या महत्त्वाच्या प्रश्नांचा उलगडा होण्याची शक्यता आहे . त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. त्यानंतर तपासाची सूत्रे आता वेगाने फिरले आहेत. यामुळे या प्रकरणाला आता लवकरच न्याय मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.