पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण निरोगी असावं असं सर्वांनाच वाटत असतं. पण, काही आजार हे कळत नकळत उद्भवतातच. त्यात मधुमेह आणि रक्तदाब या समस्या अनेकांना भेडसावतात. त्यापासून दूर राहण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. संत्री, केळी आणि द्राक्ष यांसारख्या फळांमुळे रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. केळी हे अगदी सहज आणि स्वस्तात उपलब्ध असणारे असे फळ आहे. दररोज किमान एक केळी खाल्ल्यास आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
केळी हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचे अक्षरश: भांडार मानले जाते. यामुळेच केळीला फायदेशीर फळ मानले जाते. पिकलेले केळ हे पोटासाठी औषधापेक्षा कमी नाही. ते चांगले गुणकारी ठरते. केळीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, सोडियम, लोह आणि इतर अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट्स आढळतात. केळी हे उच्च उष्मांक असलेले फळ आहे जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते. केळीमध्ये प्रथिने, कार्ब्स, फायबर, मॅग्नेशियम, तांबे यासारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. रोज एक केळी खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. केळी खाल्ल्यास पोट आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. केळ्यामध्ये भरपूर फायबर असते आणि ते खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
याशिवाय, केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. रोज 1-2 केळी खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. बीपीच्या रुग्णांसाठी केळी खाणे फायदेशीर मानले जाते. किडनीसाठीही फायदेशीर आहे. रोज केळी खाल्ल्याने किडनी निरोगी राहण्यास मदत होते. केळीमध्ये पोटॅशियम असते जे किडनीचे कार्य सुधारते. त्यामुळे रोज 1-2 केळी खावीत. यामुळे किडनी निरोगी राहते.
तसेच पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पपई रक्तदाब तसेच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयाचे एकूण आरोग्य सुधारते. हे फळ जळजळ देखील कमी करू शकते.