नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनच्या मागणीत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. मागणीत घट झाल्याने विक्रीही घटली आहे. देशात स्मार्टफोनच्या विक्रीत दोन टक्क्यांनी घट झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. देशातील स्मार्टफोन विक्रीत वार्षिक आधारावर दोन टक्क्यांनी घट दिसून आली आहे.
गेल्या तिमाहीत शाओमी कंपनी 23 टक्के वार्षिक वाढीसह अव्वल स्थानावर राहिली. एकूण विक्रीत तिचा वाटा 18.9 टक्के होता. शाओमी अव्वल स्थानावर राहिले, तर विक्री मूल्याच्या बाबतीत सॅमसंग आघाडीवर आहे. एप्रिल-जून तिमाहीत भारतात विकल्या गेलेल्या स्मार्टफोनमध्ये 5G डिव्हाईसेसचा वाटा 77 टक्के होता, जो आजपर्यंतचा सर्वात जास्त प्रमाण आहे. याबाबतची माहिती ग्लोबल रिसर्च फर्म काउंटर पॉईंटच्या अहवालातून समोर आली आहे.
भारतीय स्मार्टफोन बाजाराने जून तिमाहीत उच्चांक गाठला आहे. प्रीमियम उत्पादनांबाबत चालू असलेल्या ट्रेंडने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. एप्रिल-जून तिमाहीत भारतात स्मार्टफोन विक्रीत वार्षिक आधारावर दोन टक्क्यांनी घट झाली आहे.